उद्योग

हॉटेल दर्शन – स्वप्नातून सुरू झालेला प्रवास


हॉटेल दर्शन – स्वप्नातून सुरू झालेला प्रवास

पुणे : पुण्याच्या मध्यभागी एकेकाळी एक महत्त्वाचे स्थान असलेल्या प्रतिष्ठित द्वारिका रेस्टॉरंटचे संस्थापक श्री. लालजीभाई ठक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मार्गदर्शनाखाली १९७६ मध्ये आहुजा कुटुंबाने दर्शनची स्थापना केली. जरी द्वारिका आज अस्तित्वात नाही, तरी तिची मूल्ये आणि आत्मा दर्शनद्वारे जिवंत आहे. याच दर्शन हॉटेलने नुकतीच यशस्वितेची पन्नास वर्षे पूर्ण केली. त्या निमित्याने आहुजा कुटुंबीयांनी प्रभात रस्त्यावरील हॉटेल दर्शन येथे छानसा सोहळा आयोजित केला होता. या वेळी या सोहळ्याचे उद्घाटन सर्व स्टाफच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. स्व. लता मंगेशकरांच्या दैवी स्वरातील सुखकर्ता दुखहर्ता ही श्री गणेशाची आरती या वेळी आवर्जून लावण्यात आली. पन्नास वर्षांपूर्वी पहाटे चार वाजता दर्शन हॉटेल मधे याच आरतीने कामाची सुरवात केली जायची. कित्येक आठवणींना या सोहळ्याच्या निमित्याने उजाळा दिला गेला.

 

अनेक नवीन उद्योजकांप्रमाणे, शीतल आहुजा यांचा असा विश्वास होता की अन्न हा एक सोपा व्यवसाय असेल—व्यवस्थापन करणे सोपे, स्थिर रोख प्रवाहासह. तथापि, वास्तवाचे स्वतःचे धडे होते. त्यानंतर जे झाले ते सहज नव्हते, तर अथक प्रयत्न होते. शॉर्टकट नाही तर त्याग होता. सुरुवातीच्या काळात, त्यांनी स्वतः सर्वकाही केले. पहाटे मंडईतून ताज्या भाज्या मिळवण्यापासून ते शटर उघडण्यापर्यंत आणि दिवसाची तयारी करण्यापर्यंत—दर्शन अक्षरशः हाताने, टप्प्याटप्प्याने बांधले गेले आहे. दर्शनची सुरुवातीला एक ज्यूस बार म्हणून परिचित होते. नंतर ग्राहकांच्या पसंती नुसार मेन्यू कार्डवरील पदार्थ एक एक करत वाढतच गेले. जेव्हा जेव्हा शीतल आहुजा काहीतरी नवीन चाखत असत किंवा नवीन पाककृती अनुभवत असत तेव्हा ते भारतीय आणि पुणेरी चवीनुसार त्यावर प्रयोग करत असे केवळ या मुळे दर्शनची स्वतःची वेगळी ओळख निर्माण झाली. एका लहान ज्यूस बारमधून दर्शन आज १५० हून अधिक पदार्थ देणारे बहु-पाककृती शाकाहारी रेस्टॉरंटमध्ये विकसित झाले आहे. अगदी सुरुवातीपासून ते आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे कृत्रिम रंग तसेच प्रेझर्वेटिव अन्न तयार करताना वापरले जात नाहीत. शुद्ध पाण्यापासून बनविलेला बर्फ तसेच कमीत कमी हाताळणीसह अन्न दररोज ताजे तयार केले जाते. व्यवसाय विकास होत असताना कोणतीही तडजोड न करता गुणवत्ता राखली आहे आणि हेच यशाचे रहस्य आहे.

 

कमवा आणि शिका संकल्पनेचे जनक –

या सोहळ्याचे खरे आकर्षण ठरले ते म्हणजे १९७६ ते १९८४ या काळात दर्शन मधे जे ‘बंधू’ होते त्यांची उपस्थिती. कमवा आणि शिका ही संकल्पना अलीकडच्या काळातील असली तरी १९७६ मधे ती शीतल आहुजा यांनी प्रत्यक्षात अंमलात आणली. त्या काळी स्वतःचे शिक्षण स्वकष्टाने करू इच्छिणाऱ्या युवकांना किंवा ज्या युवकांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे पण ज्यांना पुढे शिकायचे आहे अशांना शीतलजींनी हॉटेल मधे दिवसातील तीन तास काम करण्याची संधी दिली आणि त्याच बरोबर त्या युवकांच्या आत्मसन्मानास ठेच लागू नये यासाठी आलेल्या ग्राहकांना या युवकांना वेटर किंवा पोऱ्या न म्हणता ‘बंधू’ असा उल्लेख करण्याची विनंती नव्हे तर तसा नियमच केला गेला. आज हेच बंधू वेगवेगळ्या क्षेत्रात विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत. या सर्व बंधूंचा विशेष सत्कार या वर्धापन दिनाच्या निमित्याने करण्यात आला. हे सर्व बंधू पण आवर्जून उपस्थित तर राहिले पण शीतल अहुजांच्या बाबतीत कृतज्ञता व्यक्त करताना त्यांचे डोळे पाणावले. आज जे पद आहे प्रतिष्ठा आहे ती केवळ शीतलजींनी त्या काळी दिलेल्या कामामुळे ही एकच भावना सर्व बंधूंनी या वेळी व्यक्त केली.

 

आम्ही चालवू हा पुढे वारसा –

 

यशस्वीतेच्या या संपूर्ण प्रवासात शीतलजींच्या अर्धांगिनी लविनाजी यांची मोलाची साथ लाभली आहे. २०१४ पासून दुसरी पिढी – कुणाल आणि विशाखा समान उत्कटतेने आणि वचनबद्धतेने या प्रवासात सामील झाले आहेत. इथला प्रमुख स्टाफ हा ४५, ३०, १५, १० वर्षे जुना आहे. हॉटेल चे व्यवस्थापन कालमानाप्रमाणे बदलत गेले पण इथे पन्नासवर्षापूर्वी पासून येणारे आणि आता ७५ / ८५ वयोमान असणारे सर्वात जुने ग्राहक आज ही आपली नातवंडं पणतवंडं, मुले बाळी सुना घेऊन इथेच येतात तेव्हा घरातील सदस्य आल्यासारखे वाटते या भावना शीतल आहुजा यांनी तसेच ग्राहकांनी पण ५०व्या वर्धापनदिन सोहळ्या निमित्याने व्यक्त केल्या.


आपण सारे

संपादक : कुमार कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *