उद्योग

भारती व्यापारी वेलफेअर असोसिएशनच्या मागणीला यश


 

 

पुणे,  : भारती व्यापारी वेलफेअर असोसिएशनने पुणे शहर पोलीस आयुक्तांकडे केलेल्या मागणीला यश मिळाले असून भारती विद्यापीठ,कात्रज,धनकवडी परिसरातील व्यापाऱ्यांना नियोजित वेळेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे.व्यापाऱ्यांनी रात्री ९:३० वाजता दुकाने बंद करण्याच्या सक्तीमुळे होत असलेल्या आर्थिक नुकसानीबाबत निवेदन देत प्रशासनाकडे फेरविचाराची मागणी केली होती. विशेषतः लहान व्यावसायिक, किरकोळ दुकानदार आणि फूड व्यवसायिकांना याचा मोठा फटका बसत असल्याचे असोसिएशन चे अध्यक्ष श्री.पंढरीनाथ नामदेव खोपडे यांनी मांडले होते.

 

असोसिएशनच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने व्यापाऱ्यांच्या अडचणींची दखल घेत नियमानुसार व्यवसाय सुरू ठेवण्यास सहकार्याची भूमिका घेतली. यामुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

असोसिएशनचे अध्यक्ष : पंढरीनाथ खोपडे, सचिव : हेमंत हिंदुकाजे व विक्रांत सिंह तसेच पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाचे आभार मानले असून व्यापारी वर्गानेही या निर्णयाचे स्वागत केले आहे.

 

“व्यापाऱ्यांच्या न्याय मागणीला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून यामुळे छोट्या व्यवसायांना मोठा दिलासा मिळाला आहे,” अशी प्रतिक्रिया असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

यावेळी अभयश्री नाईकनिंबाळकर,मिलिंद बरडे,प्रमोद बागल,समरणसिंग बेदी,राजेंद्र पाटील,गिरीश भोसले व सुमेध गायकवाड उपस्थित होते.


आपण सारे

संपादक : कुमार कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *