सामाजिक

ग्रीन थंब संस्थेचा वतीने मेट्रो, कालव्यावरील बोगद्यास आणि मदरसा विरोध


पुणे:सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनाअभावी आणि वाहतूककोंडीमुळे पुणेकर हैराण झाले आहेत. त्यावर उपाय म्हणून लाइट रेल ट्रॅव्हल (एलआरटी ट्रॅम) योग्य पर्याय होऊ शकतो असे मत निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

 

एलआरटी ट्रॅमचे डबे मेट्रोच्या डब्यासारखे वातानुकूलित व आरामदायी आहेत. एलआरटीच्या एका डब्यात दोन पीएमपी बसेसएवढे प्रवासी प्रवास करू शकतात. एलआरटीमधील प्रवास मेट्रोसारखाच सुखकर असतो. बीआरटीच्या मार्गाची डागडुजी करून त्यावर एलआरटी सुरू करता येईल. त्यामुळे वेळ आणि पैशांची बचत होईल. रस्त्यावरील खासगी वाहनांची संख्या आपोआप कमी होण्यास मदत होईल.

 

तसेच खडकवासला ते फुरसुंगी पाणी बोगद्यास ग्रीन थंब संस्थेचा विरोध आहे.या प्रकल्पास हजारो कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव पीएमसीने ठेवला आहे. यातील १% रक्कम जरी गाळ काढण्यास खर्च केली तरी भरपूर पाणी वाचू शकते ज्याचा सर्वांना फायदा होईल. जे ग्रीन थंब गेल्या २० वर्षांपासून करत आहे. तेही अगदी कमी खर्चात. तो गाळ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले आहे.गाळ काढल्याने तीन ते चार टीएमसीने पाणी वाढण्यास मदत होईल. म्हणून, कालवा बंद करू नये. ऐतिहासिक वास्तू जपली पाहिजे.

 

कालव्याच्या दोन्ही काठांवर दुचाकी वाहने आणि सायकली चालवण्याची परवानगी द्यावी. जर दुचाकी वाहनांना या ट्रॅकवरून प्रवास करण्याची परवानगी दिली तर रस्त्यांवरील ५०% वाहतुक कमी होईल.

 

कालवा बंद तर कालव्याला लागून असलेल्या दोन्ही बाजूंच्या विहिरींमुळे बोअरवेलला पाणी मिळणार नाही. कीटक, पतंग, पक्षी आणि प्राण्यांना पिण्यासाठी पाणी मिळणार नाही.


आपण सारे

संपादक : कुमार कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *